*गीता जयंतीनिमित्त स्टार प्लस घेऊन येत आहे गीता महोत्सव: तुलसी के संग!*
टीझर इथे पाहा:
https://www.instagram.com/reel/DRoflCVjANZ/?igsh=d29wZ2cyZnRwN3Zz
स्टार प्लसने नुकतीच "गीता महोत्सव तुलसी की संग" या तीन भागांच्या सांस्कृतिक कंटेंट इव्हेंटची घोषणा केली असून 1 ते 3 डिसेंबर 2025 संध्याकाळी 6:30 वाजता हे विशेष भाग स्टार प्लसवर प्रसारित होणार आहेत. गीता जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून भगवद्गीतेचे कालातीत उपदेश आजच्या पिढीसाठी नव्याने अधोरेखित होणार आहेत.
स्मृती इराणी यांनी साकारलेल्या ‘तुलसी’च्या सहभागामुळे याला अधिक विश्वासार्हता लाभणार असून सांस्कृतिकदृष्ट्या हा एक मोलाचा ऐवज ठरेल, यात शंका नाही. हा केवळ एक कार्यक्रम नसून विशेष म्हणजे हा कार्यक्रम भारताच्या वाढत्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
स्मृती इराणी यांनी साकारलेली तुलसी ही व्यक्तिरेखा म्हणजे भारतातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेलं सर्वाधिक विश्वासार्ह नाव असून त्याने प्रेक्षकांना आजतागायत मोहित केलं आहे. स्मृती यांच्या तुलसी या भूमिकेने पिढ्यान्पिढ्याचा विश्वास निर्माण करून प्रेक्षकांसोबत एक भावनिक नात निर्माण केलं आहे. तुलसीची व्यापक लोकप्रियता ही जगभरात पाहायला मिळते आणि म्हणून क्योंकि सास भी कभी बहू थी सीझन 2 च्या इंटिग्रेशनदरम्यान बिल गेट्स यांनी त्यांना "जय श्री कृष्ण” म्हणत अभिवादन केलं होतं.
गीता जयंतीनिमित्त स्टार प्लस घेऊन येत असलेल्या गीता महोत्सव: तुलसी के संग! हा कार्यक्रम स्मृती इराणींच्या तुलसी सोबत आणावा, याला म्हणूनच एक सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ आहे. याविषयी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, "गीता महोत्सवासाठी पुन्हा एकदा ‘तुलसी’ बनणे ही माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारी गोष्ट आहे. भारताची सांस्कृतिक आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी वेगाने वाढत असून विशेषतः तरुण प्रेक्षक अर्थपूर्णता, आत्मपरीक्षण आणि भावनिक स्पष्टता देणाऱ्या कथांच्या शोधात आहेत. भगवद्गीता ही आपल्या सर्वात मोठ्या ज्ञानसंपदांपैकी एक आहे आणि तिचे उपदेश नव्या पिढीसाठी सादर करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यातील भागांमधून प्रेक्षकांना तीच शक्ती आणि उद्देश्य मिळेल, अशी आशा आहे"
परंपरेशी मजबूत नाळ जोडत आधुनिक दृष्टिकोनातून सादर केलेला गीता महोत्सव तुलसी के संग हा कार्यक्रम नक्कीच चर्चेचा विषय ठरतोय. या माध्यमातून नवनिर्मिती, सृजनशीलतेला नवा आयाम मिळणार असून यामुळे भारताचे अध्यात्मिक संचित सर्वदूर पोहोचेल, यात शंका नाही.
