*स्मृती इराणीने शेअर केली ‘क्योंकि’ या लोकप्रिय मालिकेने OTT वर मिळवलेली मोठी सिद्धी: “इतर मालिकांची प्रत्येकी सरासरी वेळ 28 मिनिटे तर आमच्या या मालिकेसाठी दर आठवड्याला व्यतीत केलेला समय 104 मिनिटे!”*
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणीचे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात मोठे योगदान आहे. तब्बल 25 वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा तुलसी या तिच्या गाजलेल्या व्यक्तिरेखेच्या रूपात दणक्यात पुनरागमन केले आहे. अलीकडे झालेल्या एका इव्हेंटमध्ये ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2.0’बाबत चर्चा सुरू असताना तिने इतरही अनेक संबद्ध विषयांवर आपले विचार मांडले. डिजिटल क्षेत्रात या मालिकेच्या अनपेक्षित यशामागचे गमक काय असावे याबाबत केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणीने सांगितले.
*25 वर्षांपूर्वी टेलिव्हिजन क्षेत्र गाजवणाऱ्या या मालिकेविषयी बोलताना स्मृती इराणीने मीडियामध्ये आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये झालेल्या बदलाविषयी टिप्पणी केली. त्या म्हणाल्या,* “25 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा कम्युनिकेशनचे डिजिटल माध्यम नव्हते. मला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की OTT वर ही मालिका चांगली कामगिरी करेल का. मालिकेच्या टेलिव्हिजनवरील परफॉर्मन्सबद्दल मिळालेल्या शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञ आहे. आमची मासिक व्ह्यूअरशिप सुमारे 5 कोटी आणि दैनिक व्ह्यूअरशिप सुमारे 1.5 कोटी आणि साप्ताहिक व्ह्यूअरशिप सुमारे 2 ते 2.5 कोटी आहे.”
‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2.0’ आणि इतर डिजिटल मालिकांच्या प्रेक्षकांच्या संदर्भात स्मृती इराणीने एक उल्लेखनीय टप्पा सांगितला. “OTT वर तत्सम मालिकांवर व्यतीत होणारा व्यक्तिगत समय 20 ते 28 मिनिटे आहे, तर आमच्या मालिकेसाठी दर आठवड्याला 104 मिनिटे इतका समय व्यतीत केला जातो. याचा अर्थ जुन्या वळणाच्या मालिकांना देखील प्रामुख्याने तरुणांचा सहभाग असलेल्या या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. जे एक रोचक तथ्य आहे.”
स्मृती इराणीने आधुनिक विषयांचा अंगिकार करण्याबाबत या मालिकेच्या लवचिकतेवर भर दिला. “2025 मध्ये आलेल्या या मालिकेत आम्ही प्रगतीशील संकल्पना घेतल्या आहेत. मालिकेच्या कथानकात आम्ही बॉडी शेमिंग, वृद्ध होण्याची प्रक्रिया वगैरे आजच्या समस्या काल्पनिक रूपात मांडल्या आहेत. त्यामुळे आधुनिक प्रेक्षकांना देखील ही मालिका आपलीशी वाटते.” तिने नमूद केले की, ही मालिका सामाजिक परिवर्तनासोबत विकसित होण्याची वचनबद्धता दर्शविते.”
‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2.0’ विषयीची चर्चा वर्तमान सामाजिक संकल्पना आणि नियम प्रतिबिंबित करण्यात स्टोरीटेलिंगची ताकद दाखवते आणि विविध पिढ्यांच्या प्रेक्षकांना आकर्षितही करते. ही मालिका पुढे-पुढे जात असताना पारंपरिक विषय आणि आधुनिक संवेदना दोन्ही एकाच वेळी दाखवत आहे आणि ही बाब स्पष्ट करत आहे की, आकर्षक कंटेंट प्लॅटफॉर्म आणि काळ यांच्या पलीकडे जातो.
