Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*इंदू आणि अधूचा तिढा सोडवणार विठुराया – ‘इंद्रायणी’त नवं वळण!*

 *इंदू आणि अधूचा तिढा सोडवणार विठुराया – ‘इंद्रायणी’त नवं वळण!*

पहा 'इंद्रायणी' सोम ते शनि संध्या. ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.



*मुंबई २७ मे, २०२५ :* कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत आता इंदू, गोपाळ आणि अधूचे आयुष्य वेगळ्या वळणावर येऊन पोहचणार आहे. गेल्या काही भागांमध्ये अधूने अांदिबाईंमुळे प्रमिलाशी लग्न करण्यास होकार दिला. आणि आता त्यांचा साखरपुडा देखील पार पडणार असून या सगळ्यात अधूसमोर एक नवा पेच निर्माण झाला. अधूने व्यंकू महाराजांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर दुसरीकडे इंदूला आपल्या गावाला, माणसांना आणि तिच्या स्वप्नांना सोडून जायचं नाही.




 तिचं स्वप्न आहे गावातच राहून मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं. विठूच्या वाडीला, तिच्या गुरूंना सोडून तिला गोपाळसोबत न जाण्याचे ते  विठुरायाला सांगते. दुसरीकडे अधू विठूरायाला आपल्या मनातल्या भावना सांगतो कि, त्याला प्रमिलाशी लग्न करायचे नाहीये. तो व्यंकू महाराजांना सांगतो कि, माझं इंदूवर जीवापाड प्रेम आहे लग्न कारेन तर इंदूसोबतच... आता इंदू आणि अधूचा तिढा सोडवणार विठुराया. ते कसे होणार ? पुढे मालिकेत काय होणार जाणून घेण्यासाठी बघा 'इंद्रायणी' सोम ते शनि संध्या. ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.



दरम्यान, अधू आणि प्रमिलाचा साखरपुडा मात्र पार पडणार आहे. आता बघायचं आहे कि हा गुंता कसा सुटणार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.