*इंदूपासून गोपाळ कायमचा दुरावणार का?*
पहा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई, २२ एप्रिल २०२५ :* ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी सध्या रंगतदार वळणावर पोहोचली आहे. इंदू आणि गोपाळ यांच्यातील मैत्रीचे नाते एका मोठ्या गैरसमजुतीच्या विळख्यात अडकले आहे. गोपाळला विठूच्या वाडीत परत आणण्यासाठी इंदू आणि अधूने आखलेला प्लॅन यशस्वी होतो, मात्र त्याचवेळी रंजनाच्या येण्याने इंदूच्या मनात अनेक शंका निर्माण होतात.
नक्की यांचे नाते काय आहे मैत्री की त्यापलीकडे अजूनही ? रंजनाच्या आगमनाने इंदू आणि गोपाळ यांच्यात खटके उडू लागले असून, या गैरसमजुतीचा शेवट एका मोठ्या वादात होतो. वादाच्या पार्श्वभूमीवर गोपाळ विठूचीवाडी सोडून निघून जातो, पण त्यानंतर इंदुला मिळते ती एक धक्कादायक बातमी गोपाळच्या बसचा अपघात! या अपघातानंतर गोपाळ आणि इंदूच्या नात्यात कायमचा दुरावा येणार का? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
याच दरम्यान, गोपाळ आणि व्यंकू महाराज यांच्यातील अबोला मिटवण्याचा इंदूचा प्रयत्न सुरूच आहे. इंदूसोबतच रंजना देखील गोपाळला समजावताना दिसते, तर दुसरीकडे आनंदीबाईचे इंदूशी बदललेले वागणे सगळ्यांनाच संभ्रमात टाकत आहे. गोपाळच्या अपघातानंतर त्याचं आणि व्यंकू महाराजांचं नातं कोणत्या वळणावर जाईल? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका इंद्रायणी, सोम ते शनि संध्याकाळी ७ वाजता, फक्त आपल्या कलर्स मराठीवर.