पैसा वसूल करणारे नाटक 'मि. 420' रंगभूमीवर...
फूल टू पैसा वसूल करणारे आणि मनोरंजनाचा बार उडवणारे 'मि. 420' हे नवीन मराठी नाटक १७ फेब्रुवारीला रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे. 'मि. 420' या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.
सगळे तरुण कलावंत या नाटकात भूमिका साकारत असल्याने हे नाटक तरुणाईचे ठरणार आहे. डॉ. संदीप वंजारी, भूषण घाडी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, अक्षय पाटील, दक्षता जोईल हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. 'मि. 420' या नाटकात भूमिका करत असलेल्या कलाकारांना प्रेक्षकांनी याआधी मराठी मालिकांमध्ये पाहिलेले आहे. आता हे कलाकार प्रेक्षकांना रंगभूमीवर दिसणार आहेत.
या नाटकाची निर्मिती 'श्री दत्त विजय प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेने केली आहे. डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे.