आईचा हात धरून आपले भविष्य स्वतः घडवायला येत आहेत ‘गंगा माई की बेटियाँ’
~ झी टीव्ही घेऊन येत आहे एका सिंगल आई आणि तिच्या तीन मुलींची कहाणी; स्वाभिमान, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या ताकदीची प्रेरणादायी गाथा ~
चंदीगड, 17 सप्टेंबर 2025: पिढ्यानपिढ्या स्त्रियांनी समाजाच्या अपेक्षांचे ओझे वाहिले आहे. त्यांच्या निवडींवरुन त्यांच्याबद्दल मत कायम केले जाते, त्यांच्या संघर्षांना दाबले जाते आणि त्यांना त्यांच्या लढाया एकट्याने लढायला सोडून दिले जाते. तरीही वेळोवेळी त्यांनी आपल्या तुटलेल्या हृदयातून उभे राहत स्टिरिओटाईप्सना आव्हान दिले आहे आणि स्वतःचे भविष्य स्वतः घडवले आहे. गंगा माईची कहाणीही अशीच एक प्रेरणादायी गाथा आहे. तिला तिच्या तीन मुलींना एकटीने वाढवावे लागते, समाजाच्या टोमण्यांना सहन करावे लागते, संसार सुरळीत चालवण्यासाठी अविरत परिश्रम करावे लागतात आणि मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे लागते. तिचा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की स्वाभिमान हा इतरांनी दिलेला नसतो; तर तो आपल्यालाच स्वतःसाठी मिळवावा लागतो.
या अटळ जिद्दीचा उत्सव साजरा करत झी टीव्ही घेऊन येत आहे ‘गंगा माई की बेटियाँ’ – एका सिंगल आईची हृदयस्पर्शी कौटुंबिक कहाणी, जी समाजाच्या कलंकासमोर कधीही हार मानत नाही. ती शून्यातून स्वतःचे आयुष्य पुन्हा उभे करते, आपल्या तीन मुलींना स्वाभिमानाने वाढवते आणि त्यांना खंबीरपणे जीवनाला सामोरे जायला शिकवते. झी कन्नडवरील प्रशंसनीय मालिका ‘पुट्टकना मक्कलु’ वर आधारित ही कथा एका आईच्या धैर्यावर आणि तिच्या मुलींच्या जिद्दीवर प्रकाश टाकते आणि हे दाखवते की मुली कधीही ओझे नसतात तर त्या अभिमानाचे कारण असतात.
झी टीव्हीची नवीन ब्रँड ओळख – आपका अपना झी टीव्ही - चा एक भाग म्हणून ही वाहिनी नेहमीच खऱ्या भावनांवर आणि अर्थपूर्ण कथांवर आधारित मालिका सादर करत आली आहे. ‘गंगा माई की बेटियाँ’ ही या दृष्टिकोनाचे उज्ज्वल उदाहरण आहे. वाराणसीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा रवि दुबे आणि सार्गुन मेहता यांच्या ड्रिमीयाता ड्रामाची निर्मिती आहे.
या मालिकेचा पहिला प्रोमो ऑन-एअर आल्यापासूनच ‘गंगा माई की बेटियाँ’ सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण करत आहे. याच उत्साहाला पुढे नेत झी टीव्हीने चंदीगडमध्ये मीडियाला खास सेट टूरसाठी आमंत्रित केले आणि एक अनोख्या पद्धतीने मालिकेचे एक्सपिरिएन्शल लॉन्च केले. या भेटीचा खास आकर्षण ठरली गंगा माई (शुभांगी लाटकर) आणि तिच्या तीन मुली – स्नेहा (अमनदीप सिधू), सहाना (सृष्टी जैन) आणि सोनी (वैष्णवी प्रजापती) – यांच्यासोबतच्या मनमोकळ्या गप्पा. त्यांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन ढाब्यातून मीडियासाठी साधे पण प्रेमळ जेवण वाढले, ज्यातून मालिकेमधील त्यांच्या व्यक्तिरेखांचा उबदारपणा आणि माया थेट जाणवली.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शुभांगी लाटकर म्हणाल्या, “गंगा माई ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही; ती प्रत्येक स्त्रीचे प्रतीक आहे जी निराशेपेक्षा स्वाभिमानाची वाट निवडते. तिला सोडून दिले गेले असले तरी ती कटुतेला कधीच आपल्या आयुष्यावर राज्य करू देत नाही. उलट ती आपल्या वेदनेला शक्तीत बदलते आणि आपल्या मुलींना करुणा, जिद्द आणि आत्मसन्मानाच्या मूल्यांसह वाढवते. गंगा माई साकारताना मला भावनिकदृष्ट्या खूप समृद्ध अनुभव मिळाला.”
अमनदीप सिधू म्हणाली, “स्नेहा ही कुटुंबातील ज्वलंत व्यक्तिमत्त्व आहे – ती आपल्या परिवाराचे रक्षण करणारी, स्पष्टवक्ती आणि जिल्हाधिकारी बनण्याच्या स्वप्नाने प्रेरित आहे. वडिलांनी त्यांना सोडून दिल्यामुळे निर्माण झालेला राग ती आपल्या कुटुंबाला उभे करण्याच्या ध्येयात बदलते. स्नेहाची भूमिका साकारताना मला ताकदवान वाटते कारण ती उद्देशपूर्ण स्त्री आहे जी कधीही मागे हटत नाही.”
सृष्टी जैन म्हणाली, “सहाना ही शांत स्वभावाची, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. आपल्या मायेने आणि अप्रतिम स्वयंपाक कौशल्याने ती कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. अनेकदा ती गंगा माई आणि स्नेहा यांच्या मध्ये अडकते, पण शेवटी समतोल आणि शहाणपणाचा आवाज बनते. या व्यक्तिरेखेमुळे मला सौम्य राहण्यातली खरी ताकद कळली.”
वैष्णवी प्रजापती म्हणाली, “सोनी घरात आनंद आणि निरागसतेची झलक घेऊन येते. ती खोडकर आहे पण वयापेक्षा जास्त समजूतदार, खेळ आणि अभ्यासात उत्तम आहे आणि मेसची खातीही सांभाळते! मला ही भूमिका खूप आवडते कारण सोनी मला नेहमी आठवण करून देते की जिज्ञासा आणि आशावाद हेच कुटुंबाचे मनोबल जिवंत ठेवतात.”
या प्रभावी कलाकारांमध्ये लोकप्रिय अभिनेता शीझान खानचीही भर पडली आहे, जो बनारसचा एक भीतीदायक पण हृदयाने कोमल सावकार सिद्धांत उर्फ सिद्धूची भूमिका साकारतो. शीझान म्हणाला, “सिद्धू हे अतिशय रोचक पात्र आहे. अनेकांना त्याची भीती वाटते, पण तो मनाने खूप भावुक


