Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झी टीव्हीवरील ‘भाग्य लक्ष्मी’च्या शेवटाची तयारी – पण #RishMi जादू नेहमीच टिकून राहील!

 झी टीव्हीवरील ‘भाग्य लक्ष्मी’च्या शेवटाची तयारी – पण #RishMi जादू नेहमीच टिकून राहील!

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाग्य लक्ष्मी’, जी गेल्या सुमारे 4 वर्षांपासून आपल्या हृदयस्पर्शी कथानक आणि लक्षात राहणाऱ्या पात्रांमुळे प्रेक्षकांचे मन जिंकत होती, आता समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. 1350 हून अधिक भागांसह या मालिकेने देशभरातील लाखो लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. नशीब, स्थैर्य आणि प्रेम या संकल्पनांभोवती गुंफलेली ही कथा तिच्या भावनिक सादरीकरणासाठी ओळखली गेली, आणि आता ऋषी आणि लक्ष्मी यांच्या चढ-उतारांनी भरलेल्या प्रवासाचा शेवट होणार आहे.



मालिका शेवटाकडे वाटचाल करत असताना, प्रेक्षकही एक सुखद शेवट पाहण्याची अपेक्षा करत आहेत, जिथे लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि ऋषी (रोहित सुचांती) हे त्यांच्या नात्यामधील अनेक परीक्षांवर मात करून एकत्र येतील. नुकतेच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, कलाकार आणि क्रू सदस्यांनी एकत्र येऊन या विलक्षण प्रवासाचा आनंदोत्सव साजरा केला. सेटवर यावेळी अनेक भावुक क्षण पाहायला मिळाले. विशेष केक कापण्यात आला, हसरे चेहरे, अश्रू, आलिंगने आणि आठवणींचा साज चढला. ‘भाग्य लक्ष्मी’ला साकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमधील आपुलकी आणि कौटुंबिक भावना या सोहळ्यात स्पष्ट दिसून आली.

या प्रवासाबद्दल ऐश्वर्या खरे म्हणाली, “गेल्या 4 वर्षांत मी लक्ष्मीच्या आनंदात, दुःखात, तिच्या श्रद्धेच्या क्षणांमध्ये तिच्यासोबत जगले आहे. हे पात्र माझ्यासाठी फक्त एक भूमिका नव्हती, तर माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग झाली होती. तिच्यापासून दूर जाणे म्हणजे माझ्या एका भागापासून दूर जाणे. प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला भरभरून प्रेम दिले आणि लक्ष्मीच्या प्रवासाला स्वीकारले, यासाठी मी सदैव ऋणी राहीन. या मालिकेने मला एक व्यासपीठच नव्हे तर मैत्री, कुटुंब आणि अमूल्य आठवणी दिल्या आहेत. आमच्या दिग्दर्शकांपासून ते स्पॉट दादांपर्यंत, प्रत्येकाने ‘भाग्य लक्ष्मी’ला या उंचीवर पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. रोहित हा एक अप्रतिम सह-कलाकार आहे आणि स्मिता मॅडम, अमन, मुनिरा, पारुल मॅडम, मेघा – प्रत्येकाने काहीतरी खास दिले. या प्रवासाने माझे आयुष्य बदलून टाकले आणि मी यासाठी सदैव कृतज्ञ आहे.”




रोहित सुचांति पुढे म्हणाला, “ऋषी ओबेरॉय हे पात्र माझ्या कारकीर्दीतील एक खास पात्र राहिल.   या मालिकेने मला ओळख दिली आणि प्रेक्षकांशी जोडून ठेवलं, यासाठी मी कायम आभारी राहीन. ही फक्त एक मालिका नव्हती, तर एक भावना होती, जिच्या कथेशी लोक सहज जोडले गेले. कोणत्याही मालिकेचा शेवट सोपा नसतो, विशेषतः जेव्हा तो घरासारखी भावना देतो. पण आम्ही एक टीम म्हणून जे तयार केले त्याचा मला अभिमान आहे. आम्ही इथे ऑन-स्क्रीन आणि ऑफ- न जी नाती निर्माण केली, ती आयुष्यभर टिकतील. ‘भाग्य लक्ष्मी’ने मला आठवणी, मार्गदर्शक, हास्य  आणि विकासाची संधी दिली – आणि मी हे सर्व पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत घेऊन चालणार आहे.”

‘भाग्य लक्ष्मी’ आता निरोप घेत आहे, आणि ती प्रेम, त्याग आणि कठीण काळात नशिबावर विश्वास ठेवण्याचा संदेश मागे सोडून जात आहे. ही फक्त एक मालिका नव्हती, तर ती तिच्यात सामील असलेल्या प्रत्येकासाठी एक हृदयस्पर्शी अनुभव होता.



अशाच प्रत्येक भारतीय घराशी जोडलेल्या मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी पाहत राहा झी टीव्ही!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.