*वेदासाठी अथर्वने घेतला मोठा निर्णय !*
*अक्षय तृतीयेनिमित्त अथर्वने मायासाठी आणली अंगठी*
*'तुला जपणार आहे'* मालिकेत अथर्व मायाची कुंडली जुळत नसल्याने लग्न मोडू शकते या भीतीने माया आत्महत्येचा प्रयत्न करते. तेव्हा अथर्व तिला वचन देतो की, जरी त्यांची कुंडली जुळत नसली तरीही वेदाला आई मिळावी म्हणून तो मायाशी लग्न करेल. दर्श अमावस्येला मंजिरी वेदाचा बळी देण्याचा कट रचते. मात्र, मार्जारी तिला सावध करते की "कवडी" मिळविल्याशिवाय तिच्या काळ्या जादूचं बळ चालणार नाही. इथं पर्यंत की तिच्या नवऱ्यावरही त्याचा परिणाम होणार नाही. अक्षय तृतीयेनिमित्त अथर्व मायासाठी अंगठी विकत घेतो. पण अंबिका ती अंगठी गायब करते जेणेकरून माया-अथर्वचं एकत्र येणं थांबवता येईल. नर्मदा चुकून मीराला ती अंगठी घालायला लावते, ज्यामुळे घरात गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप होतात. अथर्व शांत आहे पण माया दुखावली जाते. दुसरीकडे अजित अथर्वला मारण्याचा कट रचतोय. अजित वेदाला फसवतो की एका गुप्त जंगलातील विधीने ती तिची आई परत येऊ शकते असं सांगतो. वेदा जंगलात निघून जाते, यामुळे घरात गोंधळ उडतो. मीरावर सगळा दोष टाकला जातो, तर माया या संधीचा फायदा घेऊन अथर्वच्या भावनिक जवळीक साधते.
*आता मीरा वेदाला शोधून आणेल? अथर्व आणि मायाच नातं काय नवीन वळण घेईल? बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' दररोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*