Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*वसुंधरा-बनी मध्ये दुरावा ?*

*वसुंधरा-बनी मध्ये दुरावा ?* 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत बनीच बोर्डिंग स्कुल मध्ये ऍडमिशन होतं आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या वसुंधराचा होस्टेल मधून पाय निघत नाही. बनीच्या मनाची देखील घालमेल होतेय तो वसुंधरा समोर रडू शकत नाहीये. मात्र वसुंधरा तिथून गेल्यानंतर बनी ढसाढसा रडायला लागतो. तर इथे जयश्री पाय दुखण्याचे खोटं खोटं नाटक करतेय. वॉर्डन बनीची सगळ्यांसोबत ओळख करून देते आणि पूर्ण दिवसाचे रुटीन समजावते. हॉस्टेलमध्ये दोन विध्यार्थी मोहित आणि प्रणित बनीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं बनीसाठी नवीन असल्यामुळे बनीला वसुंधराची खूप आठवण येते.
वसुंधरा भुकेली असल्याकारणाने आकाश तिला बाहेर जेवायला घेऊन जातो. तिकडे आकाशची भेट लकीशी होते. आकाशने बिझनेस एक्सपांड करावा म्हणून सगळंकाही गहाण ठेवून लोन घेतलंय. भास्कर ह्या विचाराच्या विरोधात आहे आणि घरामध्ये पहिल्यांदा भास्कर आणि आकाश मध्ये भांडण होतं. वसु आणि अवनी भावांच्या भांडणात पडायचं नाही असं ठरवतात. इथे बनी ने केलेला फोन वसुंधरा उचलते मात्र तिला बनी सोबत बोलता येत नाही त्यामुळे बनीचा गैरसमज होतो की वसुंधरा त्याच्या शिवाय ठाकूरांच्या घरी खुश आहे. *बनी आणि वसुंधराच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण होईल? लकी आणि वसुंधरा एकमेकांच्या समोर येतील ? यासाठी बघायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३०*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.